Skip to main content

नाती आणि पुष्पौषधी

नाती 


 जर आपल्या नात्यांमध्ये दुरावा निर्माण झाला असेल तर तो दुरावा कमी करूयात पुष्पौषधी च्या साहाय्याने !!


 नाती ही नेहमीच रूजलेली,जोपासलेली असायला हवीत. नुसतच जोडलेले नातं कधीच बंध निर्माण करत नाही. मग हलकासा एखादा धक्का पण हे नात संपवू शकतो.

हा धक्का कश्याच्याही रूपात येऊ शकतो. एखादा गैरसमज, एखादी दुसरी व्यक्ती, एखादी परिस्थिती, अगदी कश्याच्याही रूपात येऊन नातं संपवून जातो. 

मग आपण त्या व्यक्तीला, परिस्थितीला दोष देत राहातो. 

हा विचार कधीच करत नाहि की हे नात खरच रूजलेलं होत का? ओढ होती का? संवादाच योग्य खतपाणी ह्या नात्यात होत का? आणि त्या नात्याची गरज दोन्हिकडून सारखीच होती का ?

ह्या प्रश्नांची उत्तर शोधताना आपल्याला लक्षात येत की अरे हो खरच आपण समजत होतो किंवा आपल्याला हव होत तस हे नात कधीच नव्हत.  

एक सत्य आहे की दोन माणसांमधल नातं कधीच तिसऱ्या व्यक्तीमुळे तुटत नसतं. त्याला ती दोन माणसं कारण असतात. 

ह्याची कारणं खरं तर व्यक्ती सापेक्ष असू शकतात, पण महत्त्वाचा मुद्दा असतो तो नात्यांची समज किती आहे. ते निभावण्याच्या पध्दतीमध्ये काय आणि कसा फरक आहे. कारण दोघांच्या नात निभवायच्या कल्पना जर उत्तर आणि दक्षिण धृवाइतक्या वेगळ्या असतील किंवा दोघांचे नात जोडायचे उद्देश वेगवेगळे असतील तर संवादाचा योग्य पुल नात्यात कधीच बांधला जात नाही. दोन्हि व्यक्तींची फरफट होते.

नात रूजवायचा प्रयत्न करताना ह्या गोष्टींचा विचार केला गेला तर आणि तरच बंध निर्माण होतात. नाहीतर असत फक्त एक विस्कळीत जोडलेपण जे हलक्या घावानेहि विखरून जाऊ शकतं. 
अश्यावेळी ह्या नात्याला निरोप ही एक नवीन सुरवात ठरते एका वेगळ्या प्रवासाची. 
बस इतकंच !!







Comments

Popular posts from this blog

पुष्पौषधी म्हणजे काय आहेत

 स्वभावाला औषध नाही असे म्हणतात.  पण आता तसे नाही स्वभावाला औषध आहे. अणि निश्चित आहे त्याचे नाव पुष्पौषधी.  मानसिक विचारानीच भयंकर पित्ताचा त्रास हा आपल्याला होत असतो.अणि त्यातूनच विचित्र प्रमाणात उद्भवत असते ती उष्णता अणि उष्णतेने होते केस गाळणे , पोटात दाह, सतत पोट बिघडणे, मूळव्याध, तोंड येणे, अल्सर, लघवी ला जळजळ, अणि बैचेन होणे ही अवस्था तयार होते. जीव नकोसा होतो त्यातून उद्भवते नैराश्य अणि  ह्यांचे मूळ म्हणजे मनाची अवस्था अणि सतत केले जाणारे मानसिक विचार.  त्यातूनच  त्रास कमी करते ती म्हणजे पुष्पौषधी.  पुष्पौषधी एक वरदान आहे.  पुष्पौषधी पुढील गोष्टीवर काम करते.  (१) कोणत्याही कारणाने बसलेला मानसिक धक्का (२) अनामिक भीती (३) थरकाप उडवणारी भीती (४) कुठल्याही प्रकारची भीती (५) आत्मविश्वासाचा अभाव (६) रिकामेपण (७)अस्वस्थता (८) निर्णय घेता न येणे (९) काम समोर आले की गोंधळ उडणे (१०) जुन्या आठवणीत सतत हरवणे (११) भविष्याचा विचार सतावणे (१२) कल्पनारंजन, दिवास्वप्न (१३) अतिउत्साह, अतिसफाई (१४) सकाळी लवकर उठायचा कंटाळा येणे (१५) मुलांनी अभ्यासात...

चिंता कशी कमी करावी

  अशा अनेक सोप्या पद्धती आहेत ज्या चिंता कमी करण्यात मदत करू शकतात :   खोल श्वासोच्छ्वास : आपल्या नाकातून हळू , खोल श्वास घ्या आणि तोंडातून बाहेर काढा . आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करा आणि आपले मन शांत करण्याचा प्रयत्न करा . व्यायाम : शारीरिक क्रियाकलाप एंडोर्फिन सोडून चिंता कमी करण्यास मदत करू शकतात , जे नैसर्गिक मूड बूस्टर आहेत . माइंडफुलनेस : ध्यान किंवा योग यासारख्या माइंडफुलनेस तंत्रांचा सराव केल्याने तुम्हाला सध्याच्या क्षणावर लक्ष केंद्रित करण्यात आणि तुमचे मन शांत करण्यात मदत होऊ शकते . पुरेशी झोप घ्या : झोपेच्या कमतरतेमुळे चिंतेची लक्षणे वाढू शकतात , म्हणून प्रत्येक रात्री तुम्हाला पुरेशी शांत झोप मिळत असल्याची खात्री करा . इतरांशी संपर्क साधा : मित्रांशी किंवा कुटुंबातील सदस्यांशी बोलणे किंवा सपोर्ट ग्रुपमध्ये सामील होणे , तुम्हाला कमी एकटे वाटण्यास आणि समुदायाची भावना प्रदान करण्यात मदत करू शकते . एक जर्नल ठेवा : तुमचे विचार आणि भावना लिहून ...

how to be fit

  स्वस्थ रहने के नियम   सुबह के समय खली पेट १ से २ गिलास गुनगुना पानी पिए।  सुबह खाली पेट कभी भी चाय न पिए  रात्रि समय दांत साफ़ कर और १ गिलास पानी पीकर सोएं  खाने से ३० मिनट पहले आधा गिलास पानी पीएं  रात्रि सोने समय अपने पास मोबाइल न रखे  खाना खाने के बाद सौंफ या गुड़ जरूर खाये  रात्रि समय दही , चावल , राजमा न खाये  शाम ५ के बाद भारी भोजन न करें  फ्रिज का ठंडा पानी न पिएं  रोज १ घंटा योग , फिटनेस एक्टिविटी में बिताये  Regards, Ishanya Healing #fitness #health #healing #balancelife #emotionalhealth